Ad will apear here
Next
बालकवींची औदुंबर कविता : अभिवाचन - स्वाती महाळंक


चित्रकार नामानंद मोडक यांनी काढलेले, मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकातील प्रदर्शनात ठेवलेले बालकवींचे रेखाचित्र.त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांना निसर्गकवी असे म्हटले जाते. त्यांच्या बहुतांश रचना त्याची साक्ष देतात. अवघ्या आठ ओळींत आपल्यापुढे एक मनोहर निसर्गचित्र उभी करणारी आणि आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारी कविता म्हणजे ‘औदुंबर.’ मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार अन् लेखिका स्वाती महाळंक यांनी...
.....
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन 
निळा सांवळा झरा वाहतो, बेटाबेटांतुन

चार घरांचें गाव चिमुकलें पैल टेकडीकडे 
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे 
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे

झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर 
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर
- बालकवी

(बालकवींचं साहित्य ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/FK6pzC येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZOWCJ
Similar Posts
निजलेल्या बालकवीस : अभिवाचन - अक्षय वाटवे बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना झोपेतून उठविण्याच्या निमित्ताने त्यांचे गुणवर्णन करणारे गोविंदाग्रजांनी केलेले काव्य म्हणजे ‘निजलेल्या बालकवीस.’ ‘फारच थोड्या वेळात हे काव्य केलेले असल्यामुळे त्यात बालकवींचे यथार्थ गुणवर्णन आलेले नाही,’ असेही त्यांनी या गीताच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मंगेश
‘फुलराणी’ आणि ‘पैठणी’ कवितांचे अभिवाचन : मधुराणी प्रभुलकर निसर्गाचं अत्यंत सुंदर वर्णन आपल्या कवितांमधून करणारे कवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी. अत्यंत प्रसन्न आणि टवटवीत लेखन करणाऱ्या लेखिका-कवयित्री म्हणजे शांता शेळके. बालकवींची ‘फुलराणी’ ही कविता आणि शांताबाईंची ‘पैठणी’ ही कविता म्हणजे एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या साहित्यकृती. मराठी राजभाषा दिनानिमित्त
बालकवी... प्रिय सखा फुलांचा... ओढ्यांचा सांगाती! बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे! बालसुलभ कुतुहलानं निसर्गघटितांकडे पाहणारा आणि निसर्गातल्या लोभस सौंदर्यानं बेभान होणारा शब्दसूरलहरींचा प्रवासी! त्यांच्या काव्यप्रवासाचा रसास्वाद घेणारा हा लेख त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध करत आहोत.
कविवर्य कुसुमाग्रजांची ‘विशाखा’ ‘जीवनलहरी’ आणि ‘जाईचा कुंज’ यांनंतरचा ‘विशाखा’ हा कुसुमाग्रजांचा तिसरा काव्यसंग्रह. औचित्य, संयम, विलक्षण जीवन, निसर्ग, राष्ट्र यावरील प्रेम यांतून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवाह खळखळत, वेगाने वाहत राहतो, याचा प्रत्यय ‘विशाखा’तील कवितांमधून पुन:पुन्हा येतो. आज, २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language