त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांना निसर्गकवी असे म्हटले जाते. त्यांच्या बहुतांश रचना त्याची साक्ष देतात. अवघ्या आठ ओळींत आपल्यापुढे एक मनोहर निसर्गचित्र उभी करणारी आणि आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारी कविता म्हणजे ‘औदुंबर.’ मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार अन् लेखिका स्वाती महाळंक यांनी........
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळा सांवळा झरा वाहतो, बेटाबेटांतुन
चार घरांचें गाव चिमुकलें पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर
- बालकवी